सामवेदाच्या मंत्रांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आरती करणे !

श्रीविष्णूला सामवेद अत्यंत प्रिय आहे. सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वैकुंठात सामवेदाचे गायन अखंड चालू असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात श्रीविष्णुतत्त्व अधिक असल्यामुळे सामवेद गायनाने त्यांची आरती करावी.’ त्याप्रमाणे सामवेदाचे गायन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची आरती करण्यात आली.