मणीपूरमध्ये झालेल्या भूस्खलनात ७ सैनिकांसह १४ जण मृत्यूमुखी : ५० जण बेपत्ता

इंफाळ (मणीपूर) – ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. राज्यातील नोनी जिल्ह्यात ३० जून या दिवशी झालेल्या भीषण भूस्खलनात ६४ लोक ढिगार्‍याखाली दबले होते. यांमध्ये काही सैनिकांचाही समावेश आहे. त्यांच्यापैकी ७ सैनिकांसह एकूण १४ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. येथे साहाय्यकार्य चालू आहे.