त्रिपुरातील पोटनिवडणुकीत भाजप ४ पैकी ३ जागांवर विजयी

अगरताळा – राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने ४ पैकी ३ जागांवर विजय मिळवला. अन्य एका जागेवर काँग्रेसचे नेते सुदीप रॉय यांचा विजय झाला. बरडोवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री डॉ. माणिक शहा यांचा विजय झाला. त्यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार अशिष कुमार साहा यांचा ६ सहस्रांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.