नवी देहली – विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावत म्हटले की, भारत कोणत्याही परिस्थितीत वास्तविक नियंत्रणरेषेच्या सद्य:स्थितीमध्ये पालट करू देणार नाही. पूर्व लडाखच्या सीमावादावर बोलतांना जयशंकर म्हणाले, ‘‘चीनने उभय देशांमध्ये वर्ष १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारांचे उल्लंघन करत पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात चिनी सैनिक तैनात केले होते. चीनला वास्तविक नियंत्रणरेषेमध्ये एकांगी पालट करायचा होता. हे लक्षात घेऊन कोरोना महामारीशी संघर्ष करत असतांनाही भारताने पूर्व लडाखमध्ये सैन्याला पाचारण केले होते.’’ विदेशमंत्री पुढे म्हणाले की, मला असे वाटते की, आपल्या देशाने केलेले हे प्रयत्न जनता, तज्ञमंडळी आणि राजकीय पक्ष कुणीच समजू शकले नाही. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षाला चीनच कारणीभूत होता.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > चीनने भारताशी केलेल्या करारांचे उल्लंघन केले ! – विदेशमंत्री
चीनने भारताशी केलेल्या करारांचे उल्लंघन केले ! – विदेशमंत्री
नूतन लेख
- Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्यांना तडीपारीचा आदेश !
- Loksabha Elections 2024 : धर्माच्या आधारे मते मागण्याच्या आरोपावरून भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा नोंद !
- ‘आर्.टी.ई.’च्या अंतर्गत बेळगाव जिल्ह्यात ४० शाळा पात्र : एकाही इंग्रजी शाळेचा समावेश नाही !
- राहुल कळंबटे यांनी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला मिळाला देशात चौथा क्रमांक
- China Tibetan Army:चीन तिबेटी तरुणांना सैन्यात भरती करून त्यांना भारताच्या विरोधातील युद्धात उतरवणार !
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील ८५ टक्के भिकारी ‘व्यवसाय’ म्हणून भीक मागतात !