
नवी देहली – विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावत म्हटले की, भारत कोणत्याही परिस्थितीत वास्तविक नियंत्रणरेषेच्या सद्य:स्थितीमध्ये पालट करू देणार नाही. पूर्व लडाखच्या सीमावादावर बोलतांना जयशंकर म्हणाले, ‘‘चीनने उभय देशांमध्ये वर्ष १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारांचे उल्लंघन करत पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात चिनी सैनिक तैनात केले होते. चीनला वास्तविक नियंत्रणरेषेमध्ये एकांगी पालट करायचा होता. हे लक्षात घेऊन कोरोना महामारीशी संघर्ष करत असतांनाही भारताने पूर्व लडाखमध्ये सैन्याला पाचारण केले होते.’’ विदेशमंत्री पुढे म्हणाले की, मला असे वाटते की, आपल्या देशाने केलेले हे प्रयत्न जनता, तज्ञमंडळी आणि राजकीय पक्ष कुणीच समजू शकले नाही. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षाला चीनच कारणीभूत होता.
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा