(म्हणे) ‘भारताने काश्मिरींच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करू नये !’

पाकमधील जर्मनीच्या राजदूतांची नसती उठाठेव

जर्मनीचे पाकिस्तानमधील राजदूत बर्नहार्ड श्‍लोघेक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतीय अधिकार्‍यांनी हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की, काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकारांचे कदापि उल्लंघन होता कामा नये, असे विधान जर्मनीचे पाकिस्तानमधील राजदूत बर्नहार्ड श्‍लोघेक यांनी केले. ते पुढे म्हणाले की, जर्मनाच्या माजी चान्सलर एंजेला मर्केल यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काश्मीरच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली होती. तेथील लोकांशी भेदभाव न करता त्यांच्या अधिकारांचे रक्षण केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्या संदर्भात भारताने काय करावे आणि काय करू नये, हे जर्मनीने भारताला सांगण्याच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दांत भारताने जर्मनीच्या राजदूतांना सुनावले पाहिजे !
  • काश्मीरमध्ये ९० च्या दशकांत हिंदूंचा वंशसंहार झाला, तेव्हा एकतरी विदेशी देशाने तोंड उघडले होते का ?