
नवी देहली – केंद्र सरकारकडून मुसलमान, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन यांना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्य घोषित करणार्या वर्ष १९९३ मधील अधिसूचनेच्या विरोधात देवकीनंदन ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ही अधिसूचना मनमानी, तर्कहीन आणि राज्यघटनेच्या कलम १४, १५, २१, २९ आणि ३० च्या विरुद्ध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
या याचिकेत म्हटले आहे की, काही राज्यांमध्ये आणि भागांमध्ये हिंदूंची संख्या अल्प आहे; मात्र तरीही त्यांना अल्पसंख्य असल्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. लडाखमध्ये १ टक्का, मिझोराममध्ये २.७५ टक्के, लक्षद्वीपमध्ये २.७७ टक्के, काश्मीरमध्ये ४, नागालँडमध्ये ८.७४, मेघालयमध्ये ११.५२, अरुणाचल प्रदेशमध्ये २९, पंजाबमध्ये ३८.४९ आणि मणीपूरमध्ये ४१.२९ टक्के हिंदू आहेत; मात्र केंद्र सरकारने त्यांना अल्पसंख्य घोषित केलेले नाही. दुसरीकडे मुसलमान बहुसंख्य असतांना त्यांना अल्पसंख्य घोषित करण्यात आले आहे. लक्षद्वीपमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ९६.५८ टक्के, काश्मीरमध्ये ९५ टक्के, तर लडाखमध्ये ४६ टक्के आहे. यासह नागालँडमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या ८८.१० टक्के, मिझोराममध्ये ८७.१६ टक्के, तर मेघालयमध्ये ७४.५९ टक्के आहे. पंजाबमध्ये ५७.६९ शीख, तर लडाखमध्ये ५० टक्के बौद्ध आहेत.
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’