काश्मीरमधील हिंदूंच्या वारंवार होणार्‍या हत्यांसंदर्भात मान्यवरांच्या प्रतिक्रिया !

श्री. विवेक रंजन अग्निहोत्री

‘मूळचे राजस्थान येथील बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची काश्मीरमध्ये हत्या झाली. त्यामुळे आता केवळ काश्मिरी हिंदूंच्या विरोधात नाही, तर एकूणच हिंदूंच्या विरोधातच लढा चालू झाला आहे. नरेंद्र मोदी शासनाने आतंकवादाविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. आता मुसलमानांनीही आतंकवादाच्या विरोधात बोलून हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.’ – श्री. विवेक रंजन अग्निहोत्री, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक

श्री. आनंद रंगनाथन्

‘आणखी एक दिवस ! आणखी एक हिंदू ! विजय कुमार यांचा एप्रिल मासात विवाह झाला होता. ते काश्मीरमध्ये सुखी जीवन जगत होते किंवा त्यांना तसे वाटले असेल ! आज त्यांची हत्या करण्यात आली कारण ते हिंदू होते. तोच त्यांचा गुन्हा होता आणि ते (निधर्मीवादी) म्हणतात ‘आतंकवादाला धर्म नसतो !’ – श्री. आनंद रंगनाथन्, प्रसिद्ध लेखक आणि संपादक