(म्हणे) ‘भारताने जम्मू-काश्मीरला कलम ३७० पुन्हा बहाल करावे !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान ) – आशियातील चिरस्थायी शांततेसाठी भारताने ५ ऑगस्ट २०१९ पूर्वी असलेली जम्मू-काश्मीरची स्थिती कायम ठेवावी आणि जम्मू-काश्मीर राज्याला कलम ३७० पुन्हा बहाल करावे. जेणेकरून जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न चर्चेने सोडवला जाईल, असे आवाहन पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात केले.

पंतप्रधान शरीफ म्हणाले की, आमच्या भावी पिढ्यांना त्रास का घ्यायचा ? संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार आणि काश्मिरींच्या अपेक्षांनुसार हा प्रश्‍न सोडवू या, जेणेकरून सीमेच्या दोन्ही बाजूंची गरिबी संपुष्टात येईल.

संपादकीय भूमिका

‘भारत आता पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची सिद्धता करत आहे, त्यामुळे आता कलम ३७० चा विषय संपुष्टात आला आहे’, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले पाहिजे !