
गडचिरोली – येथील नक्षलवादग्रस्त भागातील एटापल्ली तालुक्यात असलेल्या डोद्दूर गावचे पोलीस पाटील कुल्ले वंजा कोवासी यांची नक्षलवाद्यांनी २३ मेच्या रात्री ९ वाजता हत्या केली. नक्षलवाद्यांनी भामरागड आणि एटापल्ली या तालुक्यांत प्रचंड धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रस्त्यांच्या कामावरील वाहनेही जाळली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४० ते ५० नक्षलवाद्यांनी पोलीस पाटलांना पुष्कळ मारहाण केली. नंतर त्यांना गोळ्या मारून ठार करण्यात आले. नक्षलवाद्यांनी त्यांचा मृतदेह रस्त्यावर आणून ठेवला. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या झाल्याची चर्चा आहे.
संपादकीय भूमिका‘आणखी किती हत्या केल्यावर नक्षलवादाच्या विरोधात कारवाई होणार ?’, हे शासनकर्त्यांनी सांगावे ! |
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न