
वेरूळ/ राजगड – स्वराज्याची पहिली राजधानी स्वराज्य मंदिर राजगड येथे ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेच्या वतीने १ मे या दिवशी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधत दुर्गदिनाच्या निमित्त किल्ल्यावरील ७ प्रवेशद्वारांचा दुर्गार्पण सोहळा सहस्रों दुर्गसेवकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. गडावरील ७ खचलेल्या ठिकाणी विशेष कारागिरांकडून सिद्ध करण्यात आलेले ७ सागवानी दरवाजे बसवण्यात आले आहेत. या वेळी हेलिकॉप्टरद्वारे सर्व प्रवेशद्वारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. प्रतिष्ठानमध्ये संभाजीनगर जिल्ह्याचा सक्रिय सहभाग आहे.
छत्रपती शिवरायांचा राजमार्ग असलेल्या पाली मार्गावरील २ प्रवेशद्वारे, गुंजवणे या मार्गाने येणार्या चोर मार्गांवरील ३ प्रवेशद्वारे, संजीवनी माची प्रवेशद्वार आणि बालेकिल्ला अशी प्रवेशद्वारे आहेत.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !