जालंधर (पंजाब) येथे गोहत्या करून फेकलेले गायींचे शिर सापडल्याने तणाव !

राज्याचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिला चौकशीचा आदेश !

केवळ चौकशी करून न थांबता संबंधितांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठीही सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक

जालंधर (पंजाब) – येथील वरियाणा गावामध्ये ४ गायींची हत्या करून त्यांचे फेकलेेले शिर सापडल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे. बजरंग दल, शिवसेना आदी हिंदु संघटनांनी येथील मार्गावर धरणे आंदोलनही केले. यावर राज्याचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गोहत्येच्या घटनेचा निषेध करत याची चौकशी करण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिला. काही दिवसांपूर्वीच राज्यातील होशियापूर येथे १८ गायींचे शिर सापडले होते.