गोहत्या प्रकरणात नेहमी धर्मांधच सापडतात. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना गोहत्या करण्याची भीती वाटत नाही, हेच यातून सिद्ध होते. – संपादक

नगर – येथील भातोडी शिवारात १९ फेब्रुवारी या दिवशी कत्तलीसाठी आणलेल्या १८ गायींची सुटका पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी आरोपी शाहरुख सय्यद, रिजवान पठाण या दोघांना अटक केली असून १० लाख रुपये मूल्याचा ट्रक, ३ लाख ३४ सहस्र रुपये मूल्याच्या गायी असा एकूण १३ लाख ३४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक सचिन वनवे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकमध्ये पाय आणि मुंडके बांधलेल्या ३ जर्सी गायी, काही लहान जर्सी गायी, १ खिलार जातीची गाय आणि २ वासरे खाली काटेरी झुडपात डांबून ठेवलेल्या आढळून आल्या.
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !