श्रीनगर येथे पोलिसांच्या बसवरील आतंकवादी आक्रमणात २ पोलीस हुतात्मा : १२ घायाळ

  • काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी त्यांचा निर्माता असणार्‍या पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे कठीण आहे, हेच आतापर्यंत समोर आले आहे. त्यामुळे आता सरकारने आतंकवाद मुळासकट नष्ट करण्यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक !
  • या घटनेनंतर भारताने पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केला, तरी त्याने आतंकवाद कायमचा संपणार नाही, हेही तितकेच खरे !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – शहराबाहेर असलेल्या जेवन या भागामध्ये पोलिसांच्या एका बसवर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये २ पोलीस हुतात्मा झाले तर १२ जण घायाळ झाले आहेत.

यांतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.