मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचीही मागणी

संभल (उत्तरप्रदेश) – भारतात रहाणार्या मुसलमानांमध्ये भारतीय संस्कृती आणि भारताचे सरकार यांच्या प्रती द्वेष आहे. ते येथील सर्व सुविधांचा उपभोग घेतात आणि भारतीय संस्कृती अन् सरकार यांना शिव्या देतात. जर ते भारतीय संस्कृती स्वीकारण्यास सिद्ध नसतील, तर भारतीय नागरिक म्हणून रहाण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे आणि त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवले पाहिजे. जर त्यांना भारतात रहायचेच असेल, तर त्यांना शरणार्थी म्हणून रहावे लागेल, असे विधान जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यतींद्रानंद गिरि यांनी केले. येथे भाजपचे नेते कपिल सिंघल यांच्या घरी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘भारताची फाळणी झाली, तेव्हा मुसलमानांसाठी पाकिस्तान देण्यात आले होते, त्यामुळे मुसलमानांना भारतात रहाण्याचे कोणतेही औचित्य रहात नाही. त्यांनी येथून निघून गेले पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.
‘वोटिंग राइट छीन मुस्लिमों को दोयम दर्जे का नागरिक बना देना चाहिए’: महामंडलेश्वर यतींद्रानंद ने कहा- भारत में रहना है तो शरणार्थी बन रहें#YatindranandGiri #Muslimshttps://t.co/3d6xuKfkHw
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 28, 2021
यतींद्रानंद गिरि पुढे म्हणाले की, भारताची फाळणी भौगोलिक आणि इतिहास यांच्या आधारे नाही, तर धर्माच्या आधारे करण्यात आली आहे. ‘हिंदू आणि मुसलमान भाऊ भाऊ आहेत’, असे म्हटले जाते; मात्र त्यांच्या संस्कृती एकमेकांशी जुळत नाही, ते कधी भाऊ होऊ शकत नाहीत.
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’