प्रशासकीय अधिकारी कामांसाठी नागरिकांच्या आंदोलनाची वाट का पहातात ? आधीच नोंद घेऊन रस्ते दुरुस्त का करत नाहीत ? – संपादक

सावंतवाडी – बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणार्या दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ या ४ तालुक्यांतील रस्ते ३१ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. खराब झालेल्या रस्त्यांविषयी बांधकाम विभागाने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्या चव्हाण यांची भेट घेतली. या वेळी चव्हाण यांनी हे आश्वासन दिले.
या वेळी परब यांनी चव्हाण यांना सांगितले की, तुम्ही जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी आहात. त्यामुळे तुमचा धाक या ठेकेदारांवर ठेवा. जिल्ह्यात काम करतांना सर्व ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवा. ज्या ठिकाणी ठेकेदार कामात विलंब करत असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा.
रस्त्याच्या कामासाठीचे कारीवडे ग्रामस्थांचे उपोषण मागे
सावंतवाडी-आंबोली मार्गावर कारीवडे येथील गवळणीचा व्हाळ, पेडवेवाडी बसथांबा या परिसरात अपघात होत आहेत. त्यामुळे या परिसरात मार्गावर गतीरोधक, दिशादर्शक फलक लावावेत आणि पांढरेपट्टे काढावेत, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी कारीवडे येथील ग्रामस्थांनी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर १५ नोव्हेंबरला आंदोलन केले. या वेळी आमदार दीपक केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तसेच कामाविषयी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांना सूचना दिल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर