तालुका मुरबाड (जिल्हा ठाणे) येथील आदिवासी मुलांना फराळ आणि फटाके यांचे वाटप !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचा उपक्रम !

फराळ आणि फटाके यांच्या वाटपप्रसंगी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

ठाणे, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना दिवाळी उत्साहात आणि आनंदात साजरी करता यावी; म्हणून विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कळवा-मुंब्रा विभागाच्या वतीने, तसेच ‘सेलिब्रेशन ग्रुप डायघर’ यांच्या वतीने फराळ आणि फटाके यांचे वाटप करण्यात आले. मुरबाड तालुक्यातील गेटाची वाडी या भागातील आदिवासी मुलांना सर्व साहित्य वितरित केले. कळवा-मुंब्रा जिल्ह्याचे बजरंग दल संयोजक श्री. मोतीराम गोंधळी, बजरंग दल सहसंयोजक रवींद्र पाटील, डायघर-शीळ विभागाचे संयोजक प्रवीण पावशे, तसेच अरुण शर्मा, दिनेश भोईर आदी पदाधिकारी आणि ‘सेलिब्रेशन ग्रुप’चे सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते.