
कोल्हापूर – शहरातील शिंगणापूर बंधार्याला मोठी गळती लागली आहे. ही गळती २४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी काढण्यात येणार असल्याने हे दोन दिवस कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. या दिवसांत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
या पाणीपुरवठ्यावर शहरातील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ प्रभाग आणि त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग यांचा समावेश आहे. या भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी पाणीपुरवठा अपुरा आणि अल्प दाबाने होईल. सर्वच प्रभागांतील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी टँकरद्वारे पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप