
कोल्हापूर – शहरातील शिंगणापूर बंधार्याला मोठी गळती लागली आहे. ही गळती २४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी काढण्यात येणार असल्याने हे दोन दिवस कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. या दिवसांत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
या पाणीपुरवठ्यावर शहरातील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ प्रभाग आणि त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग यांचा समावेश आहे. या भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी पाणीपुरवठा अपुरा आणि अल्प दाबाने होईल. सर्वच प्रभागांतील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी टँकरद्वारे पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !