
मुंबई – मराठवाड्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली; मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकर्यांच्या पाठीशी आहेत. शेतकर्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून अतीवृष्टी होत आहे. त्याचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतला. या वेळी ते बोलत होते.
‘सध्या बचाव आणि तातडीच्या साहाय्यकार्यास वेग द्यावा. महसूल विभाग, कृषी विभाग यांमुळे झालेल्या हानीचे पंचनामे तातडीने चालू करावेत. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचीही हानी झाली आहे. पिके वाहून गेली आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीने सर्वतोपरी साहाय्य पोचवावे’, असे निर्देश त्यांनी दिले.
‘पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोचू शकले नाहीत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोचवा, तसेच नवीन दिनांकांविषयी माहिती द्या’, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.
या वेळी एन्.डी्.आर्.एफ्.चे सैनिक आणि स्थानिक पोलीस यांनी धाराशिव, लातूर, संभाजीनगर, यवतमाळ येथील १०० जणांना वाचवले, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)