
यवतमाळ, २२ सप्टेंबर (वार्ता.) – येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात १६ वर्षीय रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. वैद्यकीय विभाग आणि शस्त्रकर्म विभागातील दोन आधुनिक वैद्यांमध्ये वाद झाला. त्यात ते ‘हा रुग्ण माझ्या विभागातील नाही’, असे म्हणत होते. (आधुनिक वैद्यांमध्ये अशा स्वरूपाचा वाद होणे बालिशपणाचे ! – संपादक) हा वाद चालू असतांनाच तो मुलगा मृत झाला. त्यामुळे नातेवाइकांनी ‘आधुनिक वैद्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, त्याविना आम्ही मृतावर अंत्यसंस्कार करणार नाही’, असा पवित्रा घेतला. अधिष्ठाता आधुनिक वैद्य कांबळे यांनी समिती नेमून चौकशीचे आश्वासन दिल्यावर नातेवाइकांनी माघार घेतली.
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू
क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाचे हिंदु बसचालकावर आक्रमण !