
मुंबई – महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची युती अनैसर्गिक आहे. विचार वेगवेगळे असूनही केवळ सत्तेसाठी हे एकत्र आले आहेत. गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे हे सत्तेला चिकटले आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘सत्तेचा वाटा मिळाला नाही की ओरड होते. वाटा मिळाला की, सगळे बंडोबा थंडोबा होतात. मंत्रालयाच्या बाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कोणतीही व्यवस्था उरलेली नाही. सरकार शेतकर्यांना दिलासा देणारे निर्णय घेत नाही. त्यामुळे आत्महत्या वाढत आहेत.’’
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !