
‘वरील प्रश्न काही जणांना पडतो. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
बहुतेक संत समाजातील लोकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यावर भर देतात. त्यातून त्यांचे अनेक भक्त सिद्ध होतात. त्यातील अगदीच काही भक्त त्यांनी सांगितलेली सूत्रे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनही २ – ३ जणच त्यांनी सांगितलेली साधना करून ‘शिष्य’ या पदाला पोचतात आणि पुढे त्यांनाच ‘संत’ म्हटले जाते. त्यामुळे बहुतेक संप्रदायांमध्ये ‘संत’ घडण्याची प्रक्रिया फार अल्प प्रमाणात असते.
याउलट सनातनमध्ये व्यावहारिक अडचणींसाठी कधीच मार्गदर्शन केले जात नाही. सर्वांना प्रारंभापासूनच व्यष्टी आणि समष्टी साधनेची शिकवण दिली जाते. त्यातून प्रत्येक साधक आध्यात्मिक स्तरावर कृतीशील होतो. त्याचाच परिणाम म्हणून १५ जुलै २०२१ पर्यंत सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या सहस्रो साधकांपैकी १३८१ हून अधिक साधक ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे असून ते संत बनण्याच्या मार्गावर आहेत, तर आतापर्यंत ११३ साधक संत झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !