
नगर – शिवसेनेचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख त्यांच्या काळात जलसंधारण खात्यातील साडेसहाशे कोटी रुपयांचा अपव्यवहार विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी उघडकीस आणला. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून गडाख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नेवासा तालुक्यातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे. प्रसिद्धिमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ही मागणी केली.
जलसंधारणातील 650 कोटींची जबाबदारी घेऊन राजीनामा द्या, मुरकुटेंची मंत्री गडाखांकडे मागणीhttps://t.co/cA6YuPN86z#BalasahebMurkute #ShankarraoGadakh @GadakhShankarao
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2021
‘शेतकर्यांसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्यात यावे. शेतकर्यांनी पेरणी केल्यानंतर पाऊस न पडल्यामुळे त्यांची मोठी हानी होत आहे. आता धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पुढील आठवड्यात मुळा धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यांतून शेतकर्यांसाठी आवर्तन सोडावे’, या मागण्या करण्यासाठी मुरकुटे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्या वेळी ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !