देशाची जिहादी आतंकवादी संघटनांनीही जेवढी हानी केली नाही तेवढी गांधी परिवाराने केली ! – चित्रपट निर्माते अशोक पंडित

डावीकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी

मुंबई – स्वतःच्या लाभासाठी गांधी परिवाराने काश्मीरमधील जिहादी आतंकवादाला खतपाणी घातले. आणीबाणी लागू केली. त्याच्या काळात नक्षलवाद फोफावला. देशाची जिहादी आतंकवादी संघटनांनीही जेवढी हानी केली नाही तेवढी हानी गांधी परिवाराने केली आहे, अशी कठोर टीका चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्वीटद्वारे केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून शहरी नक्षलवादी स्टेन स्वामी यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यावरून अशोक पंडित यांनी ही टीका केली.

अशोक पंडित यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले की,

१. राहुल गांधी यांचे हे ट्वीट गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने नक्षलवादाला केलेले समर्थन आणि पोषण दाखवून देते. नक्षलवादामुळे सहस्रो सैनिक हुतात्मा झाले, नक्षलग्रस्त गावे मागास राहिली आणि देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला. हा सगळा चीनचा कट होता.

२. स्टेन स्वामी हे दंगल घडवण्याच्या प्रकरणी कैदेत होते; मात्र प्रतिष्ठित वृत्तवाहिन्या आणि पत्रकार या व्यक्तीला श्रद्धांजली वाहत आहेत. तो दिवस लांब नाही जेव्हा पूर्वी आतंकवादी असलेला यासीन मलिक (हा आता काश्मीरमध्ये ‘जे.के.एल्.एफ्.’ नावाची राजकीय संघटना चालवतो) याच्या मृत्यूनंतरही ते श्रद्धांजली वाहतील.

३. राहुल गांधी, तुमचा पक्ष फुटीरतावादी गिलानी यांच्या उपचारासाठी देहलीतील पंचतारांकित रुग्णालयावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो. गिलानी हे सहस्रो काश्मिरी हिंदूंच्या मृत्यूचे कारण ठरले आहेत. शत्रूंसमवेत उभे रहाणे हे तुमच्या रक्तातच आहे.