नवी देहली – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना अनेक राज्यांनी घातलेले निर्बंध शिक्षिल करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे पुन्हा रस्त्यांवर, तसेच बाजारांत गर्दी दिसू लागली आहे. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून भीती व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या अधिकार्यांमध्ये झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. ‘निर्बंध उठवल्यानंतर जर लोकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसेल, तर कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती अत्यंत भयावह असेल’, अशी भीती या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा आदेश दिला. राज्यांच्या सचिवांना आदेश देतांना सांगण्यात आले आहे की, जर नागरिक नियमांचे उल्लंघन करत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. (नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच अन्य नागरिकांवर वचक बसत नाही आणि तेही त्याचे उल्लंघन करतात, त्यामुळे या प्रकारांना पोलीस आणि प्रशासनच अधिक उत्तरदायी आहेत ! – संपादक)
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > निर्बंध शिथिल केल्यावर नियमांचे उल्लंघन होत असल्याने तिसरी लाट भयावह ठरू शकते ! – केंद्रीय गृहमंत्रालयाला भीती
निर्बंध शिथिल केल्यावर नियमांचे उल्लंघन होत असल्याने तिसरी लाट भयावह ठरू शकते ! – केंद्रीय गृहमंत्रालयाला भीती
नूतन लेख
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात नवीन उपक्रमांच्या माध्यमातून धर्मकार्याने घेतलेली गरुडझेप !
- Devendra Fadanvis On Dharavi Mosque : विश्वस्तांनी दिलेल्या कालावधीत धारावीतील अवैध मशीद स्वत:हून पाडली नाही, तर प्रशासन कारवाई करेल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
- Increased Security In Mumbai : मुंबईतील प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
- Chennai Cow Death Electric Shock : प्राण्यांना अधिकार नसले, तरी त्यांचे संरक्षण करणे, हे राज्याचे कर्तव्य ! – मद्रास उच्च न्यायालय
- Gali Anjaneya Temple Theft : बेंगळुरू येथील प्रसिद्ध गाळी आंजनेय मंदिरात कर्मचारी आणि पुजारी यांच्याकडूनच पैशांची चोरी
- Kangra Shivling In Drain : कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे मंदिरात घुसून शिवलिंग तोडून नाल्यात फेकले !