संपादकावर खंडणी मागितल्याचा, तर टपरीचालकाने संपादकांविरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप

नगर – पानटपरीचालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून १० सहस्र रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी येथील सायं दैनिकाच्या संपादकांना अटक करण्यात आली आहे. पानटपरीचालकाने केलेला आरोप खोटा असल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणी टपरीचालकालाही कह्यात घेण्यात आले आहे. मनोज मोतियानी असे संपादकांचे नाव असून काशिनाथ शिंदे असे टपरीचालकाचे नाव आहे. दोघांवरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
‘नगर प्रेस क्लब’ने संपादकांच्या अटकेचा निषेध केला आहे. ‘प्रेस क्लब’ने ‘हा गुन्हा खोटा आहे. तो मागे घ्यावा. टपरीचालक अवैध व्यवसाय करत असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्याच्या रागातून त्याने खोटी तक्रार दिली आहे. त्यामुळे संपादकांवरील गुन्हा रहित करावा’, अशी मागणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले आहे.
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
‘नशामुक्त’ राज्य ?
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार