कचरा प्रश्नांकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाची चेतावणी
शहरातील कचरा प्रश्नाशी संबंधित चालू असणारा भोंगळ कारभार म्हणजे जनतेच्या आरोग्याशी केला जाणारा खेळच !

यवतमाळ, १४ जून (वार्ता.) – येथील नगरपालिकेने कचरा उचलण्याचे नवीन कंत्राट काढण्याचा ठराव जिल्हाधिकार्यांकडे मान्यतेसाठी पाठवला; मात्र त्यावर कुठलाच निर्णय घेतला नाही. स्वच्छता कामगारांचे वेतन थांबल्याने कचर्याच्या गाड्याही बंद आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर जागोजागी कचर्याचे ढीग साचले आहेत. काही नगरसेवक स्वव्ययातून कचरा उचलत आहेत; मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी नगरसेवकांनी दिली आहे. तसेच यासह काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कचरा टाकत आपला निषेधही नोंदवला आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !