
कोल्हापूर – राज्यातील अतीशोषित, शोषित पाणलोट क्षेत्रे आणि तेथील पाण्याच्या पातळीत झालेली घट भरून काढण्यासाठी पाऊस, पाणी संकलन आणि भूजल पुनर्भरण ही काळाची आवश्यकता आहे, असे मत भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले. भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणेच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्ताने भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणा अन् शिवाजी विद्यापिठाच्या भूगोल विभागाच्या विद्यमाने आयोजित ‘पाऊस पाणी संकलन आणि भूजल प्रदूषण’, या विषयावरील ‘वेबिनार’मध्ये ते बोलत होते. शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. शिर्के यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणेच्या उपक्रमाचे कौतुक करून यासाठी शिवाजी विद्यापीठ सहकार्य करेल, असे सांगितले. ‘वॉटर फील्ड रिसर्च फाउंडेशन’चे व्यवस्थापकीय संचालक संदीप अध्यापक यांनी पाऊस पाणी संकलन आणि भूजल पुनर्भरण या विषयावर सविस्तर माहिती दिली. पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी भूजल आणि भूपृष्ठावरील पाणीसाठे, प्रदूषण, नागरी वस्त्यांमुळे होणारे प्रदूषण, औद्योगिकरणामुळे होणारे भूजलाचे प्रदूषण, शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांमुळे होणार्या प्रदूषणाची माहिती दिली. शिवाजी विद्यापिठाचे भूगोल विभागप्रमुख संभाजी शिंदे यांनी आभार मानले.
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !