महाराष्ट्र पोलीसदलात ३० वर्षे काम करूनही तुमचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्‍वास नाही का ? – सर्वोच्च न्यायालय

परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह

नवी देहली – महाराष्ट्र पोलीसदलात तुम्ही ३० वर्षे काम केले आहे. तरीही तुमचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्‍वास नाही का ? हे धक्कादायक आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळून लावली. माझ्याविरुद्ध करण्यात येणारे अन्वेषण हा सूडाचा भाग असून हे अन्वेषण महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील अन्वेषण यंत्रणांनी करावे, अशी मागणी सिंह यांनी या याचिकेद्वारे केली होती.