
पुणे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला असला तरी या समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. गरज भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, तसेच आवश्यकता पडल्यास मराठा आरक्षणाबाबत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून ठराव देखील करता येईल, असेही त्यांनी सांगितले. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !
सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !