सातारा, २९ एप्रिल (वार्ता.) – कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाला गत १० वर्षांपासून पोलीस पाटील नसल्याने सर्वच संबंधित कामे तलाठी यांना करावी लागत आहेत. रेठरे बुद्रुक हे गाव राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते. १८ सहस्रांहून अधिक लोकसंख्या असलेले हे गाव पोलीस पाटील नसल्यामुळे खोळंबले आहे. ग्रामस्थांना विविध दाखल्यांसाठी तलाठ्याकडे हेलपाटे घालावे लागत आहेत. मध्यंतरी शासनाने रिक्त जागेवर बंजारा जातीसाठी जागा भरण्याचा आदेश काढला होता; मात्र त्या प्रवर्गातील व्यक्ती गावात नसल्याने हे पद रिक्त राहिले. रिक्त पदावर जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या अधिकारात नवी नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. (गेल्या १० वर्षांत एका गावात तलाठ्यांची नेमणूक न होणे अत्यंत गंभीर आहे. ग्रामस्थांनी पुढे जाऊन ही समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा घ्यावा. – संपादक)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी