मशिदीवरील भोंग्यांद्वारे धर्मांधांच्या जमावाला उद्घोषणा करून बोलावल्याचे उघड !

बंगालमध्ये धर्मांधांच्या जमावाने बिहारमधील पोलीस अधिकार्‍याची हत्या केल्याचे प्रकरण

  • मशिदींवरील भोंग्यांचा धर्मांधांकडून कसा वापर केला जात आहे, हे पहाता आतातरी सर्वपक्षीय शासनकर्ते भोंग्यांवर बंदी घालतील का ?
  • भविष्यात देशात अराजक माजले, तर या भोंग्यांचा वापर कसा होऊ शकतो, त्याचीच ही झलक आहे, हे लक्षात घ्या !
  • भोंगे सर्वसामान्यांना त्रास देतात, तर पोलिसांचा बळी घेतात. तरीही सरकार त्यांवर बंदी का घालत नाही ?
डावीकडून पोलीस अधिकारी अश्‍विनी कुमार आणि त्यांची मुलगी

किशनगंज (बिहार) – येथील पोलीस अधिकारी अश्‍विनी कुमार बंगालच्या दिनाजपूर येथे आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकासह गेले असता त्यांची धर्मांधांच्या जमावाने हत्या केली होती. किशनगंजचे पोलीस अधिकारी जावेद अंसारी यांनी सांगितले की, अश्‍विनी कुमार यांची हत्या करणार्‍या जमावाला तेथील एका मशिदीतून ध्वनीक्षेपकाद्वारे उद्घोषणा करून बोलावण्यात आले होते. त्यानंतर चोर आणि गुंड आले आणि त्यांनी अश्‍विनी कुमार यांची हत्या केली.

अश्‍विनी कुमार यांच्या मुलीने ‘ही हत्या एक षड्यंत्र होते’, असे सांगत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली, तसेच अश्‍विनी कुमार यांच्या पत्नीने दिनाजपूर येथे घटना घडलेल्या क्षेत्राच्या पोलीस अधिकार्‍यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

मुलीने अश्‍विनी कुमार यांच्या सहकार्‍यांवर षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तिघा धर्मांधांना अटक केली आहे. अश्‍विनी कुमार यांचा मृतदेह घरी आणण्यात आल्यावर तो पहाताच धक्क्याने त्यांच्या ७५ वर्षांच्या आईचा मृत्यू झाला.