हिंदूंनी पेटवलेली होळी धर्मांधांच्या जमावाने पाणी टाकून आणि लाथा मारून विझवली !

अकोला येथे धर्मांधांकडून होळीची विटंबना आणि हिंदूंना मारहाण !

  • हिंदूंनो, पेटवलेली होळी विझवण्याचे धर्मांधांचे कृत्य लक्षात ठेवा आणि त्यांना कठोर शासन होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या !
  • प्रत्येकच वेळी हिंदूंच्या सण-उत्सवात विघ्ने आणून त्यांना गालबोट लावण्याचा प्रयत्न धर्मांधांकडून केला जातो. कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नसणे, हेच यामागील कारण आहे !

अकोला – येथील पोला चौकातील हनुमान मंदिराच्या परिसरात होळीच्या दिवशी म्हणजे २८ मार्चला २०० ते ३०० जणांच्या धर्मांधांच्या जमावाने होळीदहनाच्या वेळी पुष्कळ अडथळे आणले. हिंदूंनी होळी पेटवल्यावर धर्मांधांनी त्यावर पाणी ओतले आणि लाथा मारून आग विझवली, तसेच हिंदूंना मारहाण केली. यासंदर्भातील चित्रफीत सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. याविषयीचे वृत्त ‘ऑप इंडिया’ने प्रसिद्ध केले आहे. (सरकारने यात लक्ष घालून धर्मांधांवर कठोर कारवाई करून हिंदूंना न्याय मिळवून द्यावा ! – संपादक)

हनुमान मंदिर आणि परिसर हा मुसलमानबहुल भाग आहे. स्थानिक हिंदू प्रत्येक शनिवारी येथे हनुमान चालिसा म्हणणे आणि आरती करणे यांसाठी एकत्रित जमतात. (हिंदूंच्या या कृतीमुळे संतप्त होऊनच धर्मांधांनी होलिकोत्सवाच्या संदर्भात असे कृत्य केले आहे, हे निश्‍चित ! असे जरी असले, तरी हिंदूंनी असे करणे न थांबवता धर्मांधांना खडसवण्यासाठी संघटित व्हावे ! – संपादक)