पाकच्या सैन्याधिकार्यांकडून भारताला शांततेचा प्रस्ताव : भारताकडून सहमती
पाकच्या आश्वासनावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवील का ? चीन आणि पाक दोन्ही मिळून माघार घेतल्याचे दाखवून भारताच्या विरोधात कट रचत आहेत का ? याचा शोध भारताने घेत दोघांच्या संदर्भात सतर्क रहाणेच देशहिताचे आहे !

नवी देहली – पाकच्या मिलिट्री ऑपरेशन्सच्या डायरेक्टर जनरल (डी.जी.एम्.ओ.) यांनी भारताच्या डी.जी.एम्.ओ. यांच्याशी हॉटलाईनवर चर्चा करून शांततेचा प्रस्ताव ठेवला. ‘प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व करार आणि शस्त्रसंधी यांचे कडक पालन करू’, असे पाकच्या अधिकार्याने सांगितले. त्याला भारतानेही सहमती दिली आहे. ही शस्त्रसंधी २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर पाकला भीती वाटू लागल्याने त्याने हा प्रस्ताव ठेवल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
Armies of India, Pakistan agree to ceasefire along LoC from Feb 24 midnight
(report by @Rezhasan, @rahulsinghx) https://t.co/rnwXqUMteP pic.twitter.com/2OyuNudf4B
— Hindustan Times (@htTweets) February 25, 2021
नियंत्रणरेषेविषयी याआधी जे काही करार झाले आहेत ते पाळण्याचे आश्वासन पाकने दिले आहे. तसेच कोणतीही अफवा किंवा अपसमज दूर करण्यासाठी हॉटलाईनवर चर्चा करण्याविषयीही दोन्ही जनरलनी सहमती दर्शवली आहे. तसेच सीमेवर फ्लॅग मिटिंग घेण्याचे ठरवले आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे