टि्वटरच्या माध्यमातून गृहयुद्ध करण्याचा कट ! – कंगना राणावत

मुंबई – ‘आदरणीय पंतप्रधान, जी चूक महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांनी केली होती, ती बिलकूल करू नका…त्या चुकीचे नाव होते ‘क्षमा’. टि्वटर कितीही वेळा क्षमा मागेल; पण क्षमा करू नका. त्यांनी भारतात गृहयुद्ध करण्याचा कट रचला होता’, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे. कंगना यांनी यापूर्वी टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली होती; मात्र आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.