नवी देहली – प्रजासत्ताकदिनी देहलीमध्ये शेतकर्यांच्या टॅ्रक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारामागे संयुक्त किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत, तर योगेंद्र यादव स्वतःचा स्वार्थ साधत आहेत, असा आरोप पंजाबमधील काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू यांनी केला आहे.
‘ किसान, सरकार के दुश्मन नहीं है लेकिन @_YogendraYadav नहीं चाहते हैं कि रास्ता निकले ‘ #FarmersProtest https://t.co/Fa8a4zgexJ
— Times Now Hindi (@TimesNowHindi) February 10, 2021
बिट्टू यांनी म्हटले की, जर योगेंद्र यादव यांना अटक केली गेली, तर शेतकरी आणि सरकार यांच्यामधील चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकते; कारण यादव हेच या दोघांमध्ये आग लावणारे आहेत, असाही आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी बिट्टू यांच्यावर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी काही जणांकडून आक्रमण झाले होते.