शरजील उस्मानी याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत ! – नीलेश राणे

नीलेश राणे

मुंबई – एक शरजील उस्मानी हिंदु समाजावर टीका करतो; पण त्याच्याविरोधात फक्त तक्रार केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत. परत अशांची हिंदु समाजाकडे वाकड्या दृष्टीने बघायची हिंमत होणार नाही, असे विधान भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केले आहे. शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे. ‘शरजील याला अटक किंवा त्याची चौकशी होणार नसेल, तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूंना सडका म्हणणार नाही, याचे दायित्व आमचे’, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.