
मुंबई – एक शरजील उस्मानी हिंदु समाजावर टीका करतो; पण त्याच्याविरोधात फक्त तक्रार केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत. परत अशांची हिंदु समाजाकडे वाकड्या दृष्टीने बघायची हिंमत होणार नाही, असे विधान भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केले आहे. शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे. ‘शरजील याला अटक किंवा त्याची चौकशी होणार नसेल, तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूंना सडका म्हणणार नाही, याचे दायित्व आमचे’, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !