५१ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

पणजी, १८ जानेवारी (वार्ता.) – वर्ष १९७० चा काळ हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णकाळ होता. या काळात हिंदी चित्रपटासाठी नवीन संकल्पना, चित्रपट क्षेत्र वृद्धींगत करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आदी प्रकार झाले. या काळात चित्रपट अभिनेत्यांमध्ये निरोगी स्पर्धा होती आणि या काळात कुणीही कुणाचा सूड उगवत नव्हते, असे मत चित्रपट निर्माते राहुल रवैल यांनी व्यक्त केले. ‘५०, ६० आणि ७० च्या दशकांतील चित्रपटनिर्मिती’, या विषयावर आयोजित परिसंवादात चित्रपट निर्माते राहुल रवैल बोलत होते. या संवाद कार्यक्रमात ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने अनेक महनीय व्यक्तींनी सहभाग घेतला.
संवाद कार्यक्रमात राहुल रवैल हिंदी चित्रपटसृष्टीच्या १९५० पासूनच्या प्रवासाविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘वर्ष १९६० मध्ये के. असिफ आणि मेहमूद यांनी अनेक चांगले चित्रपट बनवले. त्यानंतर वर्ष १९७० मध्ये बाबूराम इशरा यांनी ‘चेतना’ चित्रपटाचे अल्प कालावधीत चित्रीकरण करून त्या काळी एक विक्रम केला. या काळात अभिनयाने भरलेला ‘जॉनी मेरा नाम’ हा चित्रपट आला. या काळात अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ चित्रपटाने ‘रागीट युवा पुरुषा’च्या प्रतिमेला जन्म दिला. वर्ष १९७० ते १९८० या काळात हिंदी चित्रपटसृष्टी खर्या अर्थाने बहरली आणि आताही ती बहरत आहे.’’
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी