
- आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.
- ‘भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती म्हणावी.
- आरतीचा अर्थ लक्षात घेऊन म्हणावी.
- आरती म्हणतांना शब्दोच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असावा.
- आरती म्हणत असतांना प्राथमिक अवस्थेतील साधकाने टाळ्या वाजवाव्यात, तर त्यापुढील अवस्थेतील साधकाने टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा.
- घंटा मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.
- आरती म्हणत देवाला ओवाळतांना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.
- तबक देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाचे अनाहतचक्र ते आज्ञाचक्र असे गोलाकार ओवाळावे.
- ‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना म्हणावी.
- यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
- कापूर-आरती ग्रहण करावी. ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवून आरती ग्रहण करावी. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)
- देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
- त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
- यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.
- मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आरती कशी करावी ?’)
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
कोथरूड (पुणे) येथे ‘अमळनेरकर महाराज सेवा संघा’च्या वतीने भव्य ‘नऊकुंडी दत्तयाग’ आणि ‘वायनदान’ पूर्णाहुतीने सोहळा पार पडला !