
भुवनेश्वर (ओडिशा) – वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या ५० व्या विजय दिनाचे औचित्य साधत व्हाईस अॅडमिरल एस्.एच्. सरमा यांचा सत्कार करण्यात आला. व्हाईस अॅडमिरल सरमा ९८ वर्षांचे असून त्यांची वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयामध्ये अविस्मरणीय आणि प्रमुख भूमिका आहे.

हा सत्कार सरमा यांच्या ‘नेव्ही हाऊस’ या निवासस्थानी आयोजित सोहळ्यात प्रख्यात नागरिक, समाजसेवक, अधिवक्ते, मान्यवर आणि लेखक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सरमा यांनी वर्ष १९७१ च्या युद्धातील स्वतःची भूमिका, तसेच नौदल आणि ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ या युद्धनौकेने विजयात पार पाडलेल्या भूमिकेविषयी सांगितले.
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक
गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !