शिरवळ येथे अविश्‍वास ठरावाला विरोध दर्शवत जनतेचे सरपंचांच्या बाजूने मतदान

जनतेचे सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्या बाजूने मतदान

सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – खंडाळा तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी पानसरे या मनमानी कारभार करत असल्याचे सांगत महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना अविश्‍वास ठराव पाठवण्यात आला होता. विशेष ग्रामसभेत जनतेतून मतदान घेतल्यावर अविश्‍वास ठरावाच्या बाजूने १ सहस्र ८६७ मते, तर ठरावाच्या विरुद्ध २ सहस्र ५२१ मते पडली. पानसरे यांच्या चांगल्या कार्यपद्धतीला जनतेने मत दिले. त्यामुळे पानसरे पुन्हा एकदा शिरवळच्या सरपंच झाल्या आहेत.