वाघापासून संरक्षण होण्यासाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावणार


पांढरकवडा, १८ डिसेंबर (वार्ता.) – टिपेश्‍वर अभयारण्याशेजारील ७२ गावांत वाघांची पुष्कळ दहशत वाढली आहे. ही भीती घालवण्यासाठी वन व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह प्रत्येक वाघाला ‘जीपीएस्’ प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य संघर्ष अल्प करून जंगलावर अवलंबून रहाणे अल्प करण्यासाठी वर्ष २०१५ डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना चालू केली.