ठार बहिरे झालेले पोलीस !

‘दीपावलीच्या दिवसांत मुंबईमध्ये पहाटेपर्यंत फटाके फोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी फटाकेबंदी केवळ कागदावरच राहिली. गेल्या ४ वर्षांचा आढावा घेता तुलनेने ध्वनीप्रदूषण अल्प असले, तरी ‘आवाजी फटाके फोडू नयेत’, या आवाहनाला नागरिकांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. जुहू येथील ७२ वर्षीय नागरिक प्रकाश चौधरी यांनी गंगाधर पिलाजी चौधरी मार्ग येथे १६.११.२०२० या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून ११.३० वाजेपर्यंत आवाजी आणि वायू प्रदूषण करणारे फटाके सातत्याने फुटत असल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला २७ वेळा दूरभाष केला; मात्र फटाक्यांवर कुठलेही नियंत्रण आले नाही. (यामुळे पोलिसांची विश्‍वासार्हता जनमानसांत काय आहे ? ते दिसून येते ! – संपादक)’