श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. ‘नकारात्मक विचारांनी भरलेले मन हे एकप्रकारे भुताच्या घरासारखे असते. सेवेमुळे मनातील नकारात्मक विचारांचा लय होतो.

२. भगवंताची लीला अनुभवणे, म्हणजेच साधना आहे.

३. ‘आत्मशुद्धीसाठी’ केलेले प्रामाणिक प्रयत्न, म्हणजे ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ प्रामाणिकपणे राबवणे आहे.

४. आपल्याला आपल्या देहाची विभूती बनवायची आहे, सामान्यांप्रमाणे राख करायची नाही. यासाठी साधना करून देह शुद्ध करावा लागतो, तरच देह जळल्यानंतर त्याची विभूती बनते.

५. देह म्हणजे शिररावर पांघरलेले एक वस्त्रच आहे. त्यालाही नंतर टाकायचे आहे. ते चितेवर जळले की, देह नष्ट होतो; पण आत्मा अविनाशी रहातो.’

६. ‘विज्ञान आणि अध्यात्म’ यांचा संगम साधून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या उत्कर्षासाठी झटणारे फार अल्प आहेत. अशांपैकी आपण एक बनणे, म्हणजे खर्‍या अर्थाने हिंदुत्व जोपासणे होय.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ  (१०.१.२०१६) ॐ