१५ दिवसांपासून पाण्याची टंचाई

सातारा, २१ जून (वार्ता.) – १५ दिवसांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईने गडकर आळी आणि समाधीचा माळ परिसरातील नागरिक विविध अडचणींना तोंड देत आहेत. शेवटी सहनशीलतेचा उद्रेक होऊन महिलांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना घेराव घातला. ३ जूनपासून नळ कोरडे आहेत. घरात पाणी येत नाही. पाणी कधी देणार ? अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार केला. मागील वेळी जाब विचारायला आल्यानंतर आम्हाला कार्यालयातून बाहेर काढण्यात आले होते. त्या वेळी दमदाटी करणारे नगरसेवक आता कुठे आहेत ? आमचे नगरसेवक कुठे गेले आहेत ? मत मागायला घरोघरी येणारे आता का दिसत नाहीत ? असे अनेक प्रश्न महिलांनी उपस्थित केले.
पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे म्हणाले की, काही तांत्रिक अडचणींमुळे गडकर आळी आणि समाधीचा माळ परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही दिवसातच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक
पिंपरी-चिंचवड येथे यंदा पावसाळ्यात अनुमाने ५ लाख देशी झाडांची लागवड !
भिवंडी येथे ८८ जणांना विषबाधा, मुसलमान उपाहारगृह चालकाविरुद्ध गुन्हा नोंद !
परभणीत मंदिराचे छत कोसळले; ७ भाविकांचा मृत्यू !
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ