भिवंडी येथे ८८ जणांना विषबाधा, मुसलमान उपाहारगृह चालकाविरुद्ध गुन्हा नोंद !

प्रतीकात्मक चित्र

ठाणे – भिवंडी येथील खंडूपाडा परिसरातील एका उपाहारगृहामध्ये शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर ८८ जणांना विषबाधा झाली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उपाहारगृहाचा चालक दिलशाद अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. (नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍या उपाहारगृह चालकाविरुद्ध कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक) विषबाधा झालेल्या सर्वांना उपचारांसाठी येथील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

प्रारंभी एका कुटुंबातील ६ जणांसह १४ जणांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर आणखी ७४ जणांना तसाच त्रास जाणवल्याने बाधितांची संख्या ८८ वर पोचली. रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. माधवी पदारे यांनी सर्व रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा उपाहारगृहांवर बंदीच आणायला हवी !