
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण काय ?’ (१५.७.२०२२)
१. त्वचेशी संबंधित कायेश्वरीदेवीचे कार्य

‘कायेश्वरीदेवी’ ही भगवान शिवाची शक्ती मानली जाते. ‘व्यक्तीच्या त्वचेची ‘निर्मिती करणे, पोषण करणे, तिच्या रंगाची निर्मिती करणे आणि तिचे रक्षण करणे’, ही कार्ये कायेश्वरीदेवी करत असते. कायेश्वरी शक्ती व्यक्तीच्या शरिरातील प्रामुख्याने ‘त्रिगुण, तसेच पृथ्वी, आप आणि तेज ही पंचतत्त्वातील तत्त्वे’, यांद्वारे त्वचेचे कार्य करत असते.
२. व्यक्तीच्या शरिरात कायेश्वरी शक्तीचे स्थान
व्यक्तीच्या मूलाधारचक्रात जीवनशक्तीचा वास असतो. तेथे कायेश्वरी शक्तीचे स्थान असते. व्यक्तीतील जीवनशक्तीद्वारे तिच्या शरिरात असंख्य सूक्ष्म ऊर्जाप्रवाह निर्माण होतात. त्यांच्यामुळे शरिराच्या प्रत्येक घटकाला कार्य करण्याची शक्ती मिळते. जीवनशक्तीतील कायेश्वरी शक्तीद्वारे व्यक्तीच्या शरिरात त्वचेशी संबंधित पेशी आणि सूक्ष्म ऊर्जाप्रवाह निर्माण होतात.
३. व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण
कायेश्वरी शक्तीतील ‘पृथ्वीतत्त्वामुळे त्वचेचे थर आणि रंग निर्माण होणे, आपतत्त्वामुळे त्वचेचा रंग टिकून रहाणे अन् तेजतत्त्वामुळे त्वचेच्या रंगात विविध छटा निर्माण होणे’, ही कार्ये घडतात. कायेश्वरी शक्ती व्यक्तीच्या डाव्या बाजूची चंद्रनाडी (शीतल) आणि उजव्या बाजूची सूर्यनाडी (उष्ण) यांद्वारे कार्य करत असते. कायेश्वरी शक्तीचे त्वचेशी संबंधित कार्य करण्याचे स्वरूप चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांच्या अनुक्रमे शीतल अन् उष्ण या गुणधर्मांमुळे पालटते. परिणामी व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता दिसून येते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ६.१.२०२६, वेळ : सकाळी ११.३८ आणि कालावधी : ३० सेकंद)
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम