
पुणे – महापालिकेने पाषाण तलावातील सहस्रो माशांच्या मृत्यूप्रकरणी २ अभियंते, आरोग्य निरीक्षक, सेवक वर्ग विभागात नियमांचे उल्लंघन केलेले अधीक्षक आदींचे निलंबन मागे घेतले आहे, तसेच त्यांची विभागीय चौकशी रहित करून त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या बदल्या केल्या आहेत. पाषाण तलावात दूषित पाण्यामुळे सहस्रो माशांचा मृत्यू झाला होता. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाषाण तलावाला भेट दिल्यानंतर त्यांना अधिकारी सांगत असलेली माहिती आणि खरी स्थिती यांत तफावत दिसून आली. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेतले. (असे अधिकारी असल्यास महापालिकेतील निर्णय योग्य होणार का ? यासाठी खोटी माहिती देणार्यांवरही कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)
आयुक्तांनी २ कार्यकारी अभियंता, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांचे निलंबन केले होते, तसेच सामान्य प्रशासन विभागात अनियमितता दिसल्याने अतिरिक्त आयुक्तांनी अधीक्षकांचे (प्रभारी प्रशासन अधिकारी) निलंबन केले होते; मात्र या पाचही अधिकार्यांचे निलंबन मागे घेतले आहे. सामान्य प्रशासन विभागातील अधीक्षकांची औंध बाणेर येथील क्षेत्रीय कार्यालयात बदली केली आहे.
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !