‘एआय’द्वारे आपत्ती नियंत्रणाचा प्रयत्न ! 

मुंबई – राज्यातील मान्सूनपूर्व सिद्धतेचा आढावा घेतांना सर्व विभागांनी त्यांचे दायित्व प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ (आदेश आणि नियंत्रण यंत्रणा) विकसित करण्यासाठी कार्यवाही करावी’, असेही त्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.