सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू !

तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर आणि काठाजवळ आलेले अनेक मृत आणि काही जिवंत मासे 

सोलापूर – शहरातील ऐतिहासिक सिद्धेश्वर तलाव परिसरात दूषित पाणी आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे माशांचे हाल होत आहेत. तलावातील अनेक मासे पाण्याच्या पृष्ठभागावर आणि काठाजवळ येत असून काही मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. मृत माशांना खाण्यासाठी  कावळ्यांची गर्दी होत असल्याने तलाव परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सकाळपासून फिरण्यासाठी येणार्‍या नागरिकांनी याविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ‘तलावातील माशांना प्राणवायू मिळत नाही, पाणी दूषित झाले आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासन तातडीने उपाययोजना करणार का ?’, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दूषित पाण्याचा स्रोत शोधून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

मासे मृत होईपर्यंत कोणतीच कारवाई न करणारे प्रशासन काय कामाचे ? ऐतिहासिक तलावाची अशी दुर्दशा ज्यांच्यामुळे झाली आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक !