मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या आदेशानंतर अवघ्या ३ दिवसांत व्यापक कारवाई
१ कोटी ४३ लाख रुपयांचे अमली पदार्थही केले जप्त !

चेन्नई (तमिळनाडू) – अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी कारवाईचे आदेश दिले. यानंतर तमिळनाडू पोलिसांनी अवघ्या ३ दिवसांत ३ सहस्र २४६ गुन्हेगार, तसेच ४१९ अमली पदार्थ तस्कर यांना अटक केली. या मोहिमेत १५ सहस्र ३४९ लोकांची तपासणी करण्यात आली. यात १२ सहस्र ६५० अट्टल गुन्हेगारांचा समावेश होता. यांपैकी ३ सहस्र २४६ लोकांना पुढील चौकशीसाठी अटक करण्यात आली.
अमली पदार्थ कायद्यांतर्गत अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत पोलिसांनी २९४ गुन्हे नोंदवले. २६८ किलोग्राम गांजा आणि २ सहस्र ४७६ अमली गोळ्या जप्त केल्या. त्याचे अनुमानित मूल्य १ कोटी ४३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४८ घंट्याच्या आत जोसेफ विजय यांनी मोठे निर्णय घेतले. यातच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अनुमाने ६५ अमली पदार्थविरोधी कृती दलांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !